
अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्या: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीकोणातून एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिले.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वच विभागप्रमुखांशी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
आजच्या लोकशाही दिनी पुरवठा विभागाकडील एक अर्ज प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी आपल्या सरकार पोर्टलवरील अर्जाबाबतही आढावा घेतला. त्याशिवाय कार्यालयीन स्वच्छता आणि स्वच्छतागृहातील स्वच्छताबाबतही सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या.