
खैर- ए -उम्मत फांडेशन मिरकरवाडा रत्नागिरीच्या वतीने इंडिया मुशायरा कार्यक्रमाला पालकमंत्री ना.उदय सामंत यांची उपस्थिती
कोणताही खंड न पाडता कायम स्पर्धा सूरू ठेवा,लागेल ती मदत पालकमंत्री म्हणून करणार
रत्नागिरी :आज पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीती रत्नागिरी येथील विवेक हाँटेलच्या भव्य हॉलमध्ये ऑल इंडिया मुशायरा म्हणजेच अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन खैर- ए -उम्मत फांडेशन मिरकरवाडा रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक ,आरोग्य, बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा उद्योगमंत्री ना. उदय सामंतयांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आले.यावेळेस मुशायरे कार्यक्रमामुळे सांस्कृतिक क्षेत्रात भर पडली असल्याचे मत पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी मांडले.कोणताही खंड न पाडता कायम स्पर्धा सूरू ठेवा,लागेल ती मदत पालकमंत्री म्हणून मी करेन असा शब्द पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिला.

या कार्यक्रमात भारताच्या विविध राज्यातील ऊर्दू आणि हिंदीचे मशहूर व प्रसिद्ध खालील शायर आणि कवी आपली अदाकारी सादर केले.शरफ नानपारवी -दिल्ली,सज्जाद झंझट-उत्तराखंड,विभा शुक्ला-वाराणसी उत्तर प्रदेश, हमीद भुसावली भुसावल महाराष्ट्र,सरिता सरोज-रायपुर छत्तीसगढ,सिराज खान रत्नागिरी महाराष्ट्र, अफजाल दानिश बुरानपुर मध्य प्रदेश,कमर एजाज. औरंगाबाद महाराष्ट्र,आदर्श दुबे सागर मध्य प्रदेश 10–जीयाउल्ला खान अमरावती महाराष्ट्र,राना तबस्सुम मुंबई महाराष्ट्र,आबीद नजर बुरानपुर मध्य प्रदेश,तालीब सोलापुरी सोलापूर महाराष्ट्र,वारीस वारसी मेरट उत्तर प्रदेश मुईन अचलपूरी अमरावती महाराष्ट्र यांनी सहभाग नोंदवला होता.
. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तूजा,कोकण बँक चेअरमन असिफ दादान,व्हाईस चेअरमन असगर डबीर,तालुका प्रमुख बाबू म्हाप,मन्सूर काझी,शकील माजगावंकर,अलिमियां काझी. अध्यक्ष आल इंडिया मुशायरा कमेटी.तथा वरिष्ठ पत्रकार आणि रहीम अकबर अली.अध्यक्ष. खैर ए उम्मत फांडेशन.मिरकरवाडा रत्नागिरी आदी उपस्थित होते.
