
राष्ट्रवादीच्या मागणीनंतर मोकाट गुरांवर उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी घेणार बैठक
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील शहर आणि उपनगरातील मोकाट गुरे यांची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणात अपघात होत असून मोकाट जनावरांवर कारवाई करण्याबाबत संबंधीत प्रशासनाच्या संबंधित विभागाची बेपर्वाई, उदासीनता दिसून येते असल्याचे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर यांनी सांगितले. मोकाट जनावरे आज अक्षरश: नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. मात्र या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यात संबंधित प्रशासनाकडुन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. मोकाट गुरे घोळक्याने फिरत असल्याने जिल्ह्यामध्ये रात्रीच्यावेळी मोठ्याप्रमाणत अपघात होत असून जखमी झालेल्यांचेही प्रमाण मोठे आहे याप्रश्नाकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही असे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर यांनी सांगितले त्यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. राजन सुर्वे, ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. सिध्देश शिवलकर, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. संकेत कदम, गोळप जिल्हापरीषद गट अध्यक्ष श्री. सुकेश शिवलकर आदी उपस्थीत होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यावर ठिकठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून आज नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. जिल्ह्यामधील शहरातील आणि तालुक्यामधील अनेक ठीकाणी रस्त्याच्या मध्यभागी १० ते १५ गायींचा कळप थांबून रस्त्यावरच आपला ठिय्या मांडत आहेत. रात्रीच्यावेळी ही मोकाट जनावरे दीसणे अशक्य होत आहेत यातून अपघात होणे, वाहनचालक पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात त्यामुळे रात्रीची वेळ ही कामगारांसाठी अतिशय कठीण असून ही आज गंभीर बाब असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर यांनी सांगितले. रात्रीच्यावेळी ही जनावरे दीसण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणुन त्यांच्या मानेला रिफ्लेक्टर पट्टा आणि शिंगावर रेडीयम लावणे गरजेचे आहे जेणेकरून ही मोकाट गुरे रात्रिच्यावेळी दिसतील त्यामुळे जिल्ह्यामध्ये होणारे रात्रीचे अपघात टाळले जातील व जिवित हानी होणार नाही त्यासाठी मोकाट गुरांच्या मानेला रिफ्लेक्टर पट्टा आणि शिंगांवर रेडीयम लावण्यासाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजनमधून करणे गरजेचे असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
मा. जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर जिल्ह्यातिल चार मुख्याधिकारी तसेच इतर संबंधीत अधिकारी यांना घेउन बैठक लावुन तुमचा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्यामुळे ख-या अर्थाने जिल्हामध्ये मोकाट गुरांमुळे रात्रीचे होणारे अपघात टळणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेश मयेकर यांनी सांगितले. माळनाका येथिल नगरपालिकेकडून वर्टीकल गार्डन करण्यात येणार होते त्यासाठी २६ लाख रु. निधीची तरतुद करण्यात आली होती त्या वायफळ खर्चा विरोधात श्री. सुदेशजी मयेकर यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते ते वर्टीकल गार्डन रद्द झाल्यामूळे मा. जिल्हाधीकारी यांचे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर यांनी आभार मानले.