
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पदी सिध्देश शिवलकर यांची नियुक्ती
रत्नागिरी :तालुक्यातील एक धडाडीचे युवा नेतृत्व सिध्देश शिवलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबिसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल देशमुख आणि ओबिसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या हस्ते शिवलकर यांना
नियुक्तिपत्र देण्यात आले.
जिल्हा निरिक्षक श्री. बबनरावजी कनावजे, जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. प्रकाशशेठ शिगवण, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. राजनदादा सुर्वे, श्री. खलिपे
उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये ओबीसी संघटनेचे कार्य नुतन जिल्हाध्यक्ष सिध्देश शिवलकर यांच्या माध्यमातून चांगले होणार असून त्यांचे कार्य मी पाहीले असल्याचे ओबिसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी सांगितले आणि त्यांनी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्ह्याचा लवकर दौरा करून ओबोसी सेलच्या सर्व तालुका अध्यक्ष यांच्या नियुक्त्या केल्या जातील आणि त्यांच्या मार्फत ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी तत्पर असेन जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये बळकट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाकडून माझी ओबीसी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही असे श्री. सिध्देश शिवलकर यांनी सांगितले.
सिध्देश शिवलकर हे ओबीसी समाजातील एक सामाजीक कार्य करणारे धडाडीचे नेतृत्व असून त्यांनी रत्नागिरी तालुका युवक अध्यक्ष पद भुषवीताना तालुक्यामध्ये युवक संघटनेचे काम चोख पार पाडले आहे. कोवीडच्या काळात सिध्देश शिवलकर यांनी जिल्ह्यातील असंख्य रुग्णाना मदत केली असल्यामुळे त्यांचे नाव आज जिल्हाभर झाले आहे. श्री. शिवलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबिसी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे जिल्हाभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा जिल्ह्यातील ओबीसी समाजामध्ये निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ओबीसी समाजाला सिध्देश शिवलकर यांच्या रुपाने ओबिसी सेलच्या माध्यमातून जिल्ह्याला एक चांगल नेतृत्व लाभले असल्याचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले.