
जिल्हापरिषदच्या शाळेचे वीज बील शासन निर्णयाप्रमाणे आकारण्यासाठी फैयाज मुकादम यांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी
रत्नागिरी : शासनाने जिल्हापरिषद शाळांचे वीज बील व्यावसायिक न आकारता घरघुती दराने आकारावे असा निर्णय केला असून अद्याप अंमलबजावणी होत नाही. जिल्हापरिषद च्या शाळा हे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्गम गावात वसलेल्या आहेत. तसेच शासन निर्णया नुसार लाईट बील घरगुती आकाराने आकरण्याचा निर्णय झाला. मात्र ही बाब अद्याप सर्व शाळेला समजलेली नाही. त्या मुळे अद्याप वीज बील घरगुती दरानेच येत आहे. तसेच अनेक शालांचे वीज कार्यालय 25 ते 30 किलोमीटर लांब असल्याने या कार्यालयात जाण्या पेक्षा जिल्हापरिषद च्या शिक्षण विभाग आणि महावितरण च्या अधिकाऱ्यांची संययुक्त बैठक घेऊन त्या शाळांची यादी घेऊन सर्व शाळांचे वीज बील घरघुती दराने आकरण्या बाबत नियोजन करावे तसेच शिक्षकांना त्याचा त्रास होणार नाही म्हणून संबंधीत विभागाने बैठक घ्यावी असे आदेश राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले आहे. या बाबत मजगांव सरपंच, शिवसेना विभाग संघटक फैयाज मुकादम यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले होते.