
दक्षिण कोरियातील काही कंपन्यांशी उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी केला करार
उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांचा दक्षिण कोरियातील दौरा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी लाभदायी ठरणार
रत्नागिरी:महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत हे गेले तीन दिवस दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून या ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांशी त्यांनी संवाद साधून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी त्यांना विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन काही कंपनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांचा दक्षिण कोरियातील दौरा हा महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रासाठी लाभदायी ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये येथील स्थानिकांसाठी रोजगार निर्माण व्हावा,औद्योगिक क्षेत्रात भर पडावी,नवीन रोजगार महाराष्ट्रामध्ये यावेत, महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातून उन्नतीकडे जावा या उद्देशाने महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत जेव्हापासून उद्योग मंत्री झाले आहेत तेव्हापासून तळमळीने उद्योग क्षेत्रात काम करत आहेत. काही दिवस ते दक्षिण कोरियातील कंपन्यांच्या भेटीसाठी दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक कंपन्यांशी बैठका करून त्यांना महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन काही कंपन्यांनी महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांशी करार सुद्धा केले आहेत. त्यामुळे या दौरामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात मोठे गुंतवणूकदार येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.