
जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्यांनी उतरवला एक रुपयात पीक विमा
रत्नागिरी :प्रधानमंत्री पीक विमा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्यांनी लाभ घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संखेने शेतकर्यांनी लाभ घेतला.
शेतकर्यांसाठी खरीप हंगामातील 14 पिकांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. त्यासाठी शेतकर्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार असून, उर्वरित पीक विमाचे हप्ते शासन भरणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने खरिपातील 14 पिकांना विम्याचे संरक्षण दिले आहे. यामध्ये भात, बाजरी, भुईमूग, ज्वारी, नाचणी, उडीद, मूग, मका, तूर, कारले, सोयाबीन, कापूस, तीळ व कांदा या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे ही पिके घेणार्या बहुतांश शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून येते.
या योजनेची प्रचार, प्रसिद्धी जिल्हा अधीक्षक कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. या योजनेच्या हप्त्याचे पैसे शासन भरणार असल्याने व शेतकर्यांनी नाममात्र 1 रुपया भरून लाभ घ्यायचा असल्याने लाभार्थी वाढले आहेत.