
नवीन डिझेलचा कोटा वाढवण्यासाठी मच्छिमारांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची भेट
रत्नागिरी:- रत्नागिरीमधील मच्छिमारांनी आज रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांची भेट घेऊन डिझेलचा कोटा वाढवणे संदर्भात चर्चा केली. तसेच मच्छीमारांचे असणारे प्रश्नही यावेळेस पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आले. मच्छीमार मेटाकुटीस आले असताना शासनाचे निकष आणि दिला जाणारा त्रास हा खूप असून यावरती उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री यांनी थेट राज्याचे मत्स्यविकास मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना फोन द्वारे संपर्क साधून रत्नागिरीतील मच्छीमारांचे प्रश्न त्यांच्या समोर ठेवले. रत्नागिरीतील मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच मिटींग लावणार असल्याचे मत्स्यमंत्री यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शब्द दिला आहे. डिझेलचा कोटा वाढवण्यासाठी दिल्लीतील केंद्र मंत्री यांच्याशी मच्छीमारांना घेऊन भेट घेऊन त्यांना तुमची समस्या सांगणार असल्याची पालकमंत्री यांनी सांगितले
तुमच्या विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द पालकमंत्री यांनी दिला.
यावेळी नुरुद्दीन पटेल,इम्तियाज मुकादम,इम्रान मुकादम,सुहेल साखरकर,मेहबूब फडनाईक,हनिफ मालदार,अजीम बिरादार,सिराज वाडकर,नाझिम मुल्ला,यासिन माजगावकर,जुनेद होडेकर,सफवान होडेकर,तालिब दर्वे,वहिद दर्वे आदी उपस्थित होते.