
जयगड ग्रामपंचायतीमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार
रत्नागिरी :तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावातील जागरूक ग्रामस्थ देवीदास चव्हाण यांनी केला आहे. भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता करणाऱया जयगड सरपंच यांना यापकरणी बडतर्प करण्याची कारवाई करावी अशी जिल्हाधिकारी यांच्यासह, जि.प.पशासन, पंचायत समिती रत्नागिरी यांच्याकडे तकार केली आहे.
याविषयी दिलेल्या तकारीच्या निवेदनात सन 2022 च्या लेखा परीक्षण अहवालामुळे ही बाब उघडकीस आली. सन 2018/19 ते 2020/21 या कालावधीत ग्रामपंचायत जयगडचा ग्रामनिधी व शासनाकडून विकासकामांसाठी देण्यात आलेला थेट निधी योग्य ठिकाणी योग्य तऱहेने खर्च न होता सरपंच आणि ग्रामसेविका दुक्कलीने गडप केल्याचा आक्षेप देवीदास चव्हाण यांनी घेतला आहे. त्याचा हिशोबच लेखा परीक्षकांना सापडत नाही. 14 व्या वित्त आयोगाचा निधीसुद्धा हिशोबात सापडत नाही.
जयगडच्या विद्यमान सरपंच श्रीमती फरजाना असलम डांगे आणि तत्कालीन ग्रामसेविका यांचा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार / अपहार नुकताच जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आला. याबाबत जागरूक नागरिक देवदास गणपत चव्हाण यानी आता थेट जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गट विकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी यांना पत्रव्यवहार (तक्रार ) केला आहे.
मागासवर्गीयांच्या नावावर 11,46,345 / रुपये ग्राम निधीमधील 1,89, 173 / रुपये कोणत्याही अंदाजपत्रक व मूल्यांकनाशिवाय खर्च केलेली 45,62,046/ रुपये, साहित्य खरेदीमध्ये 17,11,305/ रुपये ग्राम पंचायतीच्या दोन बँक खात्यामधील आढळलेली तफावत 1648658.68 रुपये अशी एकूण रक्कम रुपये 92,77,707/ रुपयेचा आक्षेपित हिशेब आता सरपंच श्रीमती फरजाना असलम डांगे आणि तत्कालीन ग्रामसेविका यांचेकडून वसूलीची कारवाई आहे.
यामध्ये संबंधित ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी या विषयात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. संबंधित सरपंचाच्या गैरकारभाराबद्दल अनेकवेळा सर्व संबंधिताकडे दाद मागूनही कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे सध्या ग्रामपंचायतीच्या स्तरावरील भ्रष्टाचार कोटीच्या घरात गेला आहे. येत्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेपूर्वी सदरचा विषय निकालात निघाला नाही तर, या भ्रष्टाचाराविरोधात देवदास गणपत चव्हाण हे ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत.
सध्या जयगड परिसरात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्नसुद्धा वाढलेले आहे. विद्यमान सरपंचाची यापूर्वीची भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपली गेल्याने आता हा कोटीच्या घरात जाणारा अपहार बिनबोभाट होवू शकला. ग्रामसभेत या विषयाची दाद मागितली असता दखल घेतली जात नाही. विषयपत्रिकेवर हा विषय सरपंच घेत नसल्याचे त्यांनी देवीदास चव्हाण यांचे म्हणणे आहे. सन 2016 पासून सर्व आर्थिक अहवाल दडपल्याने आणि त्याचसोबत गटविस्तार अधिकारी गट विकास अधिकारी यांनी आपापले कर्तव्यपालन न केल्यामुळे हा भ्रष्टाचाराला कुरण लाभल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. या सर्व पकाराला गावातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून पशासनाकडे तकार करण्यात आल्याचे देवीदास चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.