
जिल्ह्यातील 9 बसस्थानके, आगारांच्या कामकाजासाठी 9 कोटी मंजूर
रत्नागिरी :जिल्ह्यातील 9 बसस्थानके आणि आगारांच्या कामकाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 कोटी मंजूर केले असून पावसाळा संपल्यावर या कामाला सुरुवात होईल. रत्नागिरी बसस्थानकात 30 सीटर थिएटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी बसस्थानक अत्याधुनिक करण्याविषयी माहिती दिली. सर्व बसस्थानकाचे काँक्रिटिकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानके सर्व सोयींयुक्त असावेत, यासाठी हा प्रयत्न असून या पावसाळ्यानंतर हे काम सुरू होईल असेही तर बोलले.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी 138 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून यातील 35 बसेस जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे उर्वरित बसेस लवकरच दाखल होतील, असेही राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.