
पालकमंत्र्यांची जिल्ह्यातील डीएड्, बीएड् धाराकांनी घेतली भेट
सेवानिरुत्त शिक्षकांना घेण्यापेक्षा स्थानिक बेरोजगार ,बीएड् धारकांना कायम करण्याची केली मागणी
रत्नागिरी:आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत याची जिल्ह्यातील डीएड्, बीएड् धारकांनी भेटघेवून नव्याने रुजू झालेल्या तात्पुरत्या शिक्षकांच्या अडचणी संदर्भात पालकमंत्री यांना माहिती दिली.यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा बदल्या मोठ्या प्रमाणात केल्याने जि. प. शाळांतील शिक्षणाचा कारभार चालवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने तात्पुरते शिक्षक जूनच्या शेवटी नेमण्यात आले. मात्र सातत्याने बदलणार्या निर्णयांमुळे हे तात्पुरते शिक्षक आठ दिवसांतच घरी बसले आहेत. त्यांना अद्याप मानधनही देण्यात आलेले नाही. तसेच सद्या सेवानिवृत्ती शिक्षक भरण्याचे आदेश शासने काढले आहेत.त्यांना २० हजार रुपये मानधन देणार आहेत.त्याचा मानधनवर आम्ही काम करणाऱ्यास तयार असल्याचे सांगितले.त्या संदर्भात शिक्षकमंत्री यांच्याशी चर्चा करुन न्याय देण्याची मागणी केली.
यावेळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांच्याशी संपर्क करुन तात्काळ जिल्ह्यातील बीएड,डीएड,धारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली.यावेळी तासिका बेसवर याच उमेदवारी नेमणूक कायम करण्याची पालकमंत्री यांनी विनंती केली.त्याप्रमाणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केले.त्या संदर्भात बुधवारी मिटिंगही आयोजित केली गेली आहे.
यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी,माजी शिक्षणसभापती दीपक नागले,समीर सुतार,दुर्वा बावकर,भाग्यश्री शिंदे,दिलीप पाटील,ओंकार केळकर,प्रतिभा वरक,विनोद कांबळे,रमेश चव्हाण रुपेश झोरे,संध्या पंडित,तन्मय जोशी आदी सह अनेक डीएड,बीएड धारक उपस्थित होते.
