
शालेय वयातच विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रेमाचे धडे दिले पाहिजेत: रामचंद्र सावंत
रत्नागिरी:भारताच्या उज्वल भवितव्यासाठी भारत सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच राष्ट्र प्रेमाचे धडे दिल्यास, हेच विद्यार्थी भविष्यातील भारतासाठी आदर्श नागरिक बनतील व देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतील असा आशावाद भारतीय सैन्यातील माजी सैनिक रामचंद्र देमा सावंत यांनी व्यक्त केला.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या ठिकाणी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९९९ साली झालेल्या युद्धाला २४ वर्षे पूर्ण झाले. त्या निमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत कारगिल विजयी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
रामचंद्र सावंत पुढे म्हणाले की, देशाचे रक्षण करत असताना सैनिकासह पोलीस कधीही स्वतःचा व आपल्या कुटुंबापुरता मर्यादित विचार करत नाही, तर माझा देश आणि माझ्या देशातील सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिले पाहिजे या हेतूने प्रेरित होऊन ते कार्य करत असतात. मात्र या आदर्शवत कामगिरी करणाऱ्या सैनिकाची किंमत समाजामध्ये कधीकधी ठेवली जात नाही याची खंत वाटते, म्हणून असे होऊ नये यासाठी समाजामध्ये भविष्यात नागरिक होणाऱ्या विद्यार्थ्यांना, संस्काराचे धडे देणे काळाची गरज आहे.
यावेळी माजी सैनिक रामचंद्र सावंत यांचा यथोचित सन्मान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे यांच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी या दिनाच्या निमित्ताने शाळेतील पियुष धनावडे, मयुरेश कुर्टे, नीलिमा धनावडे, तन्वी कुर्टे, नियती धनावडे, सलोनी कुर्टे, प्रणव धनावडे, ऋतिका कुर्टे, अबोली धनावडे, सृष्टी तांबटकर, राज धनावडे, स्वरा धनावडे, प्रांजल कुर्टे, शामली धनावडे या विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगतातुन कारगिल विजय दिनानिमित्त माहिती सांगितली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतमाता, सैनिक आणि इतर वेशभूषा केल्याने कार्यक्रमाची शोभा वाढण्यास मदत झाली. याप्रसंगी संदीप धनावडे, विश्वनाथ शिर्के शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वैशाली कुर्टे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मनस्वी तांबटकर, सांस्कृतिक समितीच्या प्रमुख सुवर्णा धनावडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे निमित्ताने शाळेतील दहावी बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी सांगत कारगिल युद्धातील अनेक घटना आपल्या प्रास्ताविकातून सांगितल्यावर युद्ध कशाप्रकारे झाले याबाबत माहिती सांगून कार्यक्रमाचे आयोजनाचा हेतू स्पष्ट केला, तर कार्यक्रमाचे निवेदन शाळेतील शिक्षिका रेणुका धोपट यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास बारगुडे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत व त्यांनाही सैन्यांचे जीवन समजावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून, शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे - जे चांगले देता येईल, ते - ते देण्याचा प्रयत्न यापुढेही होईल याची खात्री दिली. या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये, शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ नारायण जाणू धनावडे, बाळू धनावडे, चंद्रकांत तांबटकर यांच्यासह वाटद कवठेवाडी, वाटद धोपटवाडी, वाटद तांबटकरवाडी मधील माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षरा शिर्के, यश धनावडे, सोहम कुर्टे,तेजस धनावडे यांच्यासह सर्व आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रांचा संच माजी सैनिक रामचंद्र सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सदर पत्रे ही लवकरच भारतीय सीमेवरील सैन्यापर्यंत पोहोचतील असा विश्वास रामचंद्र सावंत यांनी यावेळी दिला.