
खेड तालुक्यात मुसळधार पाऊस; जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
रत्नागिरी :तालुक्यात सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. मंगळवारी (१८ जुलै) पहाटेपासून दुपारी चार वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीचे पाणी ५ मीटरची इशारा पातळी ओलांडला त्यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात होता. मात्र आता नदीने धोक्याचा इशारा ओलांडला असल्याने प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी ७.४० मीटर वरून पाणी वाहत आहे.
दरम्यान, मंळवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत ६४ मिलिमीटर पावसासह आतापर्यंत एकूण ९९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी झाले आहे. याच कालावधीत १४०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, ६७.४९ टक्के धरण भरले आहे. मुसळधार पावसामुळे सवेणी जकरिया अल्ली चिपळूणकर यांचे घरावर झाडाची मोठी फांदी कोसळून ७२०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
सावधानतेचा इशारा

खेड येथील जगबुडीमध्ये इशारा पातळी ओलांडत धोक्याच्या पातळी देखील ओलांडली आहे. खेड शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.