
देशाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या कामाचे केले कौतुक
रत्नागिरी:महाराष्ट्रच्या उद्योग क्षेत्रात चळवळ घडवून आणणारे महाराष्ट्रचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक मुंबई येथील पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्क येथील कार्यक्रमादरम्यान देशाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी केले.राज्याचे उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या कामकाजाची प्रशंसा करताना उद्योग धोरणामध्ये राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेणारे उद्योगमंत्री म्हणून प्रशंसा केली.उद्योगमंत्री यांच्या कार्यप्रनालीचा आलेख पियुष गोयल यांनी केला.आज रत्नागिरीतील नेतृत्व पूर्ण महाराष्ट्रचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान रत्नागिरी वासियांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ना. उदयजी सामंत यांच्या गतिमान कामाचं कौतुक करत असताना म्हणाले ना.उदयजी सामंत यांच्या कामाची पद्धत,कामाचा पाठपुरावा कसा असावा तो राज्याचे मंत्री उदयजी सामंत सारखा असावा.अडचणीवर मत करत महाराष्ट्रमध्ये उद्योग क्षेत्रात ना.उदयजी सामंत क्रांती घडवतील असा विश्वास ही यां कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री ना.पियुष गोयल यांनी व्यक्त केला.महाराष्ट्रच्या उद्योग क्षेत्रात उदयजी सामंत यांनी नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.उदयजी सारखा मंत्री महाराष्ट्रला मिळाला हे महाराष्ट्रचे भाग्य असल्याचेही ते म्हणाले.केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कौतुकानंतर उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांचे कार्य किती मोठे आहे हे लक्षात येते.यां कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री पियुष गोयला,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
