
सैतवडे गावाचा विकास ही माझी जबाबदारी:- पालकमंत्री ना.उदय सामंत
सैतवडे गावाच्या विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी: तालुक्यातील सैतवडे गावाच्या विकास कामांसाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत त्यांच्या प्रमुख उपस्थित विविध कामांचे भूमिपूजन सैतवडे येथे करण्यात आले.यावेळी सैतवडे गावाच्या विकासासाठी जे जे करावे लागेल त्यासाठी मी तुमचा पालकमंत्री म्हणून करण्यास तयार असल्याचा शब्द पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिला आहेत.
यावेळी सैतवडे गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ तसेच महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे,,युवा जिल्हा प्रमुख केतन शेट्ये,युवा तालूका प्रमुख तुषार साळवी,युवा सेना विभाग प्रमुख प्रशांत घोसाळे, विभागप्रमुक योगेंद्र कल्याणकर,उपविभाग प्रमुख नामदेव चौघुले,अनिकेत सुर्वे,महिला तालूका संघटक कांचन नागवेकर,राजू साळवी,विनय गावडे,शरद चव्हाण,मेघना पाष्टे,सचिन उर्फ तात्या सावंत,ग्रामस्थ,अधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होत.