
बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू
राजापूर:- तळवडे गावातील वासुदेव राजाराम कदम यांच्या वाड्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.
सदर वासराला गोठ्यात बांधलेल्या दाव्यासहित फरफटत नेऊन सुमारे दोनशे मिटर अंतरावर नेऊन त्याला ठार केले. सदर घटनेची खबर मालकांनी पोलीस पाटलांना कळवण्यात आली असता त्यांनी तात्काळ वनविभागाचे अधिकारी श्री सदानंद घाटके यांना कळवून पंचनामा करण्याची मागणी केली. श्री घाटगे यांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेत पंचनामा करून नुकसान भरपाई देणाचे आश्वासन दिले आहे.
काही दिवसापूर्वी तळवडे गावात एका विहीरत पडलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले होते. बिबट्याला पकडून काही दिवस उलटले नाहीत तोवर ही दुसरी घटना याच गावात घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तळवडे, ताम्हाणे, करक, कारवली या पाचल परिसरातील गावातील बिबट्याचा जास्त प्रमाणात वावर वाढत असलाने व या आधी पाचल गावातील दोन जनावरांना जंगलात ठार केल्याने बिबट्यापासून सावध राहण्याचा सूचना वन विभागाकडून नागरिकांना करण्यात आल्या आहेत.