
स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते राणे यांनी पाहावं: खा.विनायक राऊत
रत्नागिरी :नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले, आपण मंत्री झाल्यानंतर कितीजणांना रोजगार दिला, हे सांगण्यापेक्षा राणे यांनी आपल्या भाषणातील सर्वाधिक वेळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड करण्यामध्येच घालवला.त्यामुळे भाजपाचे उपरे,बेईमान, गद्दारी ज्यांच्या रक्तात भिनली आहे, त्या राणे यांनी स्वःताच्या बुडाखाली काय जळतंय ते आधी पहावं,
अशी टीका ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
रत्नागिरी येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे यांच्यासह माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावरही टीका केली.
खा.राऊत पुढे म्हणाले राणे यांच्या राजापुरात झालेल्या जाहीर सभेला इकडून तिकडून फक्त ७०० ते ८०० माणसे गोळा करून आणली होती. या सभेमध्ये राणे यांनी आपल्या पक्षाने काय केले, हे सांगण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यातच अधिक वेळ घालवला,.स्वःताच्या पक्षाला एक वर्षातच विसर्जित करणारे ,शिवाय ईडीने दणका दिल्यानंतर त्यापासून वाचवण्यासाठी भाजपचे पाय चाटण्यासाठी गेलेले उपरे नेते असाही त्यांनी मंत्री राणे यांचा उल्लेख केला. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे, ते न पाहता रमेश मोरे, जयंत जाधव यांच्याबद्दल राणे विचारणा करत आहेत. त्यांच्याबाबतचा पोलीस तपास उघड असताना उलट सिंधुदुर्गातील जनता
श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यवियज भिसे, अंकुश राणे , मणचेकर यांच्या हत्येचे सूत्रधार म्हणून राणे यांच्याकडे का पाहते?याचे उत्तर राणे यांनी द्यावे. स्वःताचे हात डागाळलेले असताना उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची नौटंकी राणे यांनी करू नये .त्यापेक्षा मोदींनी दिलेला कानमंत्र दोन्ही जिल्ह्यातील जनतेला देणे अपेक्षित होते,
आपल्या ४४ मिनिटांच्या भाषणातील ३६ मिनिटे उद्धव ठाकरे यांच्याविषयी द्वेषाने बोलणा-या राणे यांनी
मंत्रिपदाच्या काळात आपण कितीजणांना रोजगार दिला, हे सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांनी जे दिले, ते मिंधे सरकार देऊ शकत नाही.
राणे यांचे वैद्यकीय महाविद्यालय उद्धव ठाकरे यांनीच दिले असल्याचेही खा.राऊत म्हणाले.परंतु एकीकडे निलेश आणि नितेश या चंगू,मंगुना कसं आवरायचं आणि दुसरीकडे डोक्यावर असलेलं मंत्री पदाच ओझ यामुळे राणे याना काही सुचेनास झालं असल्याचेही खा.राऊत म्हणाले.