
जिल्ह्यात 105 गावातील 40 हजार ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा
रत्नागिरी:- पाऊस लांबल्यामुळे पाणी टंचाईने रत्नागिरी जिल्ह्यात भीषण रूप धारण केले आहे. जिल्ह्यात 105 गावातील 198 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 198 वाड्यांतील 39 हजार 637 ग्रामस्थांना 20 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाई अधिक रौद्ररूप धारण करेल.
रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंडणगड तालुक्यात 7 गावातील 10 वाड्यांमध्ये 1 हजार 339 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. दापोली तालुक्यात 6 गावातील 16 वाड्यांमध्ये 1 हजार 550 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
खेड तालुक्यातील 30 गावातील 52 वाड्यांमध्ये 4 टँकरने 7 हजार 460 ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरु आहे. गुहागर तालुक्यात 5 गावातील 6 वाड्यांमध्ये एका टँकरने 856 ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरु आहे. चिपळूण तालुक्यात 16 गावातील 26 वाड्यांमध्ये दोन टँकरने 3 हजार 952 जणांना पाणी पुरवठा सुरू आहे.
संगमेश्वर तालुक्यात 32 गावातील 65 वाड्यांमध्ये 5 टँकरने 12 हजार 421 ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यात 4 गावातील 16 वाड्यांमध्ये 5 टँकरने 11 हजार 125 ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरू आहे, लांजा तालुक्यात 5 गावातील 7 वाड्यांमध्ये एका टँकरने 894 ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरु आहे.