
पाणी पाणी करणाऱ्यांना पाणी नाही तर पालकमंत्र्यांनी बोरवेलच दिली…!
आय सी आय सी बँकेच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी शहराला २५० बोरवेल
रत्नागिरी :रत्नागिरी शहरामध्ये पाणी प्रश्न उद्भवत असताना अनेकांना पिण्याच्या पाण्याचा हाल होत होते.मात्र महाराष्ट्राचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि रत्नसिंधू समितीचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांच्या माध्यमातून आयसीआयसीआय बँक यांच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी शहरातील जनतेसाठी सुमारे २५० बोरवेल मारले जाणार असून त्या बोरवेल मारण्याच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मीटिंगमध्ये रत्नागिरी शहरातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्यासमोर मांडला असता काही गृहनिर्माण सोसायटीमध्ये बोरवेलची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.त्यावेळेस त्यांनी पाण्याची व्यवस्था करा असेही मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्या माणसांना पाणी नाही तर चक्क बोरवेलच दिली असल्याचे उत्तम काम रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत आणि रत्नसिंधूचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केले आहे
. यां बोरवेल मारण्याची सुरवात साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ अपार्टमेंट मध्ये बोरिंग च्या शुभारंभा प्रसंगी उपस्थित जिल्हा प्रमुख राहुल पंडित,तालुका प्रमुख बाबू शेठ म्हाप वशहर प्रमुख बिपीन बंदरकर,शिल्पा ताई सुर्वे,पपू शेठ सुर्वे,सौरभ मलुष्टे,पूजा पवार,दीपक पवार,साळवी स्टॉप येथील नागरिक अण्णा अजगावकर,दत्ताप्रसाद शेट्ये,संतोष बोरकर,श्री देसाई,श्रीमती कामतेकर,तृप्ती वीरकर,योगेश वीरकर,समीर नानिवडेकर,छोट्या खानविलकर,कमलेश कामतेकर,देवांग साळवी,अंजली सावंत,चिनार प्रसादे,इर्राप्पा,लालसाब व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
