
मुरुगवाडा येथे गाडीखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : रांगेत उभ्या करून ठेवलेल्या बोलेरो टेम्पोखाली झोपणे तरुणाला महागात पडले आहे. चालकाने अचानक गाडी सुरु केल्याने त्याखाली चिरडून राजासाब नबीसाब पटेल ( वय ४१ रा. मुरूगवाडा ) यांचा जागीच मृत्यू झाला . शुक्रवारी दुपारी हि घटना घडली.
मुरूगवाडा समुद्र किनाऱ्यावर तीन बोलेरो टेम्पो रांगेत उभे करून ठेवण्यात आले होते. उन्हाळा असल्याने तेथिलच राजासाब नबीसाब पटेल ( वय ४१ रा. मुरूगवाडा )एका टेम्पो जवळ मागे झोपले होते. चालकाला याची माहिती नसल्याने त्याने गाडी सुरु केली. यावेळी राजासाब पटेल ओरडले. कोणतरी गाडीखाली आहे. असा समज झाल्याने चालकाने गाडी मागे घेतली. यावेळी गाडीच्या मागे झोपलेल्या राजासाब नबीसाब पटेल यांचा गाडीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस हे. कॉ. पलांडे यांनी आपल्या सहकाऱ्यासहा घटनास्थळी धाव घेतली . पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर अपघात दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्थानकात सुरु होते.