
अवघ्या दीड मिनिटात ‘कोकणकन्या’ एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी हजारच्या पुढे!
रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. मात्र, १५ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतिक्षा यादी अवघ्या काही मिनिटांतच एक हजारांपेक्षा वाढल्याने कोकणवासीय चाकरमान्यांचे टेंशन वाढले आहे. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल्ल झाली असून तिकीट आरक्षित करतेवेळी ‘रिग्रेट’ दाखविले जात आहे.
गणेशोत्सवाला ४ महिने उरले असतानाच कोकणात जाणाऱ्यांनी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेली कोकणकन्या एक्सप्रेस दुसऱ्याचा दिवशी हाऊसफुल झाली आहेत.
दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्या प्रत्येक वर्षी भरभरून जात असते.यंदा देखील १२० दिवस आधी म्हणजेच ४ महिने आधीपासूनच रेल्वेच आरक्षणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये मंगळवार १६ मे रोजी १३ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण करता येईल तर बुधवार १७ मे रोजी १४ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण करता येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वे तिकिटांचे आरक्षण ऑनलाईन होत असल्याने अवघ्या काही मिनिटांत एक हजारांपेक्षा अधिक तिकिटे कोकणकन्येची आरक्षित झाली. तर, इतर कोकणातील एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यास गेल्यास ‘रिग्रेट’ दाखवण्यात येत असल्याचे कोकणातील प्रवासी चांगलेच संतापले आहे.
काय म्हणते रेल्वे ?
गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी तिकीट काढणे सुरू केले आहे. त्यामुळे एकाचवेळी तिकिटे आरक्षित केल्याने प्रतिक्षा यादी वाढली. यात प्रतिक्षा यादी फुल्ल झाल्याने काही गाड्यांचे तिकीट आरक्षित करतेवेळी ‘रिग्रेट’ दाखवले जात आहे. तसेच ज्या प्रवाशांची ४०० च्या वरती प्रतिक्षा यादीत नाव आहे, त्यांना तिकीट रद्दीकरण केल्यानंतर पूर्ण परतावा रेल्वेकडून देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
१ मिनिट ४७ सेकंदात ?
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकण कन्या या गाडीची १५ सप्टेंबर २०२३ ची तिकीट फक्त १ मिनिट ४७ सेकंदात १ हजार १७१ वेटिंग मिळाली खर तर इतकी वेटिंग आरक्षित होणारही नाही तरीही प्रतीक्षा यादी तिकीट देण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशाच्या पॉकेट मधून पैसे काढून ते १२० दिवस म्हणजे ४ महिने वापरातात. रेल्वेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.