
अनुस्कुरा घाटात पुन्हा अपघात, कोणतीही जीवित हानी नाही
राजापूर:- कोल्हापूरहून पाचल च्या दिशेने येणाऱ्या स्वीप्ट कंपनीची (MH-01,VA 2860) या चार चाकी गाडीचा अनुस्कुरा घाटात अपघात होऊन, गाडी रस्त्याच्या बाजूला कलटली. या गाडीत आई वडील व मुलगी असे असे कुटुंब होते.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून सदर कुटुंब सुखरूप आहे.गाडीचे मात्र थोड्या प्रमाणात नुकसान झाले असून हा अपघात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
अनुस्कुरा घाटाचे कामं नुकतेच पूर्ण झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ग्रीटभुसा आहे. अश्यावेळी जर कोणी उताराला वेगाने वाहन चालवत असेल आणि ब्रेक मारायचा प्रयत्न केला तर गाडी स्लीप होते व अपघात होतात. हा अपघात देखील असाच घडला असल्याचे व्यक्त केले जातं आहे. या आधी देखील घाटात अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसापूर्वी नुकत्याच झालेल्या अश्याच प्रकारच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना वाहने सावकाश चालवा व स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या असं आव्हान पोलीस प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.