
पट्टेरी वाघाच्या कातड्यासह तिघांची टोळी जेरबंद; रत्नागिरी पोलिसांची कामगिरी
रत्नागिरी :पट्टेरी वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन येणारी टोळी रत्नागिरी पोलिसांनी जेरबंद केली. टोळीतील तिघांकडे पट्टेरी वाघाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. रत्नागिरीतील जांभूळ फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश साळूंखे, प्रवीण बर्गे, गणेश सावंत, अमोल भोसले, आशिष भालेकर यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पट्टेरी वाघाचे कातडे विक्री साठी घेऊन तिघेजण रत्नागिरीत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारावर तिघांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.