
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची जिल्हा परिषदेवर धडक
रत्नागिरी :जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱयांना सुधारित किमान वेतन, विशेष राहणीमान भत्ता व ग्रामपंचायत उत्पन्नानुसार 75 टक्के व 50 टक्के होत असलेल्या वेतनाचा उर्वरित वेतन हिस्सा ग्रा.पं.नी अदा करावा अशा अनेक मागण्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेला. मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी पशासनाला देण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शुकवारी 28 एपिल रोजी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने धडकले होते. ग्रामपंचायत कर्मचाऱयांच्या शासनस्तरावर मंजूर असलेल्या मागण्यांची ग्रा.पं. स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याचे या संघटनेचे अध्यक्ष किरण पांचाळ यांनी सांगितले. त्यावेळी उपाध्यक्ष संजय खताते, जिल्हा सरचिटणीस कृष्णा होडे हे देखील उपस्थित होते. कर्मचाऱयांना परिमंडळ निहाय सुधारित किमान वेतन लागू करून 1 जुलै 2007 पासून लागू असलेला थकीत राहणीमान भत्ता मिळणे आवश्यक आहे. परंतु कर्मचाऱयांना अद्यापही त्यापमाणे पूर्तता होत नाही. त्याचबरोबर मागील किमान वेतन उशिरा देण्यात आले असल्यामुळे वेतन व राहणीमान भत्ता फरक कर्मचाऱयांना अद्यापही मिळालेला नाही.
त्याचबरोबर ग्रामपंचायतत्वे उत्पन्नानुसार आŸनलाईन होणाऱया वेतनाच्या उर्वरित 25 टक्के, 50 टक्के ग्रा.पं.हिस्सा व वेशेष राहणीमान भत्ता ग्रामपंचायतींकडून अदा होत नाही. तसेच शासनाने ग्रा.पं.कर्मचाऱयांना लागू केलेल्या विविध सेवा सवलतींची जिल्ह्यातील ग्रा.पं.कडून अंमलबजावणी न केल्यामुळे ग्रा.पं.कर्मचारी सेवा सवलतींच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रा.पं.स्तरावर शासन निर्णयाची पायमल्ली होत आहे. यापूर्वीही कार्यालयावर वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. शासन निर्णयानुसार ग्रा.पं. कर्मचाऱयांना लागू होत असलेल्या विविध सेवा सवलतींची ग्रा.पं.स्तरावर अमंलबजावणी होत नसल्यामुळे या कर्मचाऱयांवर अन्याय होत आहे. तसेच कोरोना पार्दुभाव रोखण्यासाठी ग्रा.पं.कर्मचाऱयांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. शासनाकडून रक्कम 1 हजार मानधन जाहीर करण्यात आले होते. त्याचीही पूर्तता ग्रा.पं.स्तरावर अजून झालेली नाही. तसेच त्या कालावधीत मयत कर्मचाऱयांना शासनस्तरावरून विमा लाभही अजून मिळालेला नाही.
अशा विविध पलंबित मागण्यांसंदर्भात पूर्तता करण्यासाठी जि.प.पशासनस्तरावरून कोणतीच दखल घेण्यात आली नसल्यामुळे जिल्हा ग्रा.पं.कर्मचारी महासंघाने मोर्चा काढला. त्यावेळी जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ग्रा.पं. विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्याशी शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर करत पलंबित मागण्यांसदर्भात चर्चा केली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास सर्व कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.