हातीस उरुसामध्ये संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ची विनामूल्य रूग्ण सेवा
रत्नागिरी…. कोकणातील सुप्रसिद्ध पीर बाबर शेख यांचा रत्नागिरी शहरानजीक असलेल्या हातीस गावात उरुस दरवर्षी भरत असतो.या उरुसामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक केवळ रत्नागिरी तीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील भाविक श्रद्धेने उपस्थित असतात.यंदा 2 व 3 फेब्रुवारी रोजी असा हा उरुसाचा कार्यक्रम आहे,येणा-या भाविकांना आकस्मिक आजार किंवा किरकोळ उपचारासाठी दरवर्षी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी गेली 8 वर्षे तेथे दोन दिवस भाविकांची विनामूल्य सेवा करीत असते.यंदाही ही सेवा सुरू राहणार आहे.