
कुशिवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ; जनावारांवर हल्ला
चिपळूण: तालुक्यातील कुशिवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून येथील शेतकऱ्यांच्या गाई, बकऱ्या, वासरू यांना लक्ष्य करीत असून शेतकऱ्यांची मोठे नुकसान होत असून गावात भीतीचे देखील वातावरण पसरले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कुशिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांनी केली आहे.
संतोष गोसावी यांच्यासह सहकाऱ्यांचा गेली सहा वर्षांपासून शेळी पालन व्यवसाय सुरू असून मे महिन्यापासून आतापर्यंत सलग चार बकऱ्या बिबट्याने स्पष्ट केले आहेत तसेच सुरेंद्र शिगवण, दत्ताराम शिगवण यांच्या गाईं- वासरुचा बिबट्याने हर्षा पाडला आहे गावातील शेतकऱ्यांनी आपापले बकऱ्या, गुरांचे गोठे बंदिस्त केलेले असताना देखील बिबट्याचा जनावरांवर हल्ला दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून गावात भीतीचे वातावरण देखील पसरले आहे.
याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांना मिळाल्यानंतर त्यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानुसार वनपाल श्रीमती अश्विनी जाधव, पोलीस पाटील श्री. मोहिते, पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणे करत पंचनामा केला आहे. तसेच सरपंच रोशनी डिके, ग्रामपंचायत सदस्य दिलीप डिके, ग्रामपंचायत कर्मचारी पंडव यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांना सहकार्य करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. तसेच वनविभागाने बिबट्याच्या संचाराबाबत वेळीच उपाययोजना करावी,अशी मागणी सिद्धार्थ कदम यांनी केली आहे.