
दहावीच्या परीक्षेत सलग चौदाव्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल
कोकण बोर्डाचा निकाल ९८.८२ टक्के; रत्नागिरी ९८.५८ टक्के तर सिंधुदुर्ग ९९.३२ टक्के
रत्नागिरी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल आज ऑनलाइन जाहिर झाला.कोकण बोर्डाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. सलग चौदाव्या वेळी कोकण बोर्डाने ही कामगिरी केली आहे.कोकण बोर्डाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे.रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९८.५८ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९.३२ टक्के लागला आहे अशी माहिती कोकण बोर्डाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली .
कोकण बोर्डात दहावीच्या परीक्षेला २६ हजार ८६१ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २६ हजार ५४६ उत्तीर्ण झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात १८ हजार ०११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १७ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ हजार ८५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ८ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान ,बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.कोकण बोर्डात १२ हजार ९९० मुली परीक्षेला बसल्या त्यापैकी १२ हजार ८८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचा निकाल ९९.१५ टक्के लागला आहे.१३ हजार ८७१ मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी १३ हजार ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.५२ टक्के आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ८ हजार ७३० मुली परीक्षेला बसल्या त्यापैकी ८ हजार ६४२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.९९ टक्के आहे.९ हजार २८१ मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी ९ हजार ११४ उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.२० टक्के आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ हजार २६० मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी ४ हजार २३८ उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.४८ टक्के आहे.४ हजार ५९० मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी ४ हजार ५५२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.१७ टक्के आहे.कोकण बोर्डात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ०.६३ टक्के अधिक आहे.