
पोलिसांकडून ७५ मोबाईल फोन मूळ मालकांना परत
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्च २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान हरवलेले ७५ मोबाईल मूळ मालकांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईलची माहिती सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सह पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलीस शिपाई अजिंक्य ढमढेरे, तांत्रिक विश्लेषण शाखेचे निलेश शेलार यांनी तसेच रत्नागिरी शहर, लांजा, ग्रामीण, खेड, गुहागर, देवरुख, संगमेश्वर व सावर्डे या पोलीस ठाण्याच्या पोलिस अंमलदार यांनी एकत्रित काम करून प्राप्त केली.
या माहितीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गहाल मोबाईलचा शोध घेतला असता एकूण ७५ मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले व सापडलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.