
प्रकल्पबाधित, धरणग्रस्तांचे धरणे आंदोलन सुरू
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधित, धरणग्रस्त तसेच रेल्वे प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी येथील येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू झाले आहे.प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित झालेले प्रकल्पग्रस्त, खोकेधारक, धरण प्रकल्पग्रस्त तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी धरणे आंदोलन आहे. अशोकराव जाधव शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून प्रदेश काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे माजी अध्यक्षही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू झाले आहे.