
रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांची जंगी मिरवणूक
रत्नागिरी
राज्य मंत्रिमंडळाचे अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर उदय सामंत यांचा रत्नागिरीत रविवारी प्रथमच दौरा झाला. रत्नागिरी शहरात सायंकाळी नेत्याच्या स्वागतासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी डि.जे., ढोलताशे, फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी सहीत जंगी मिरवणूकीने रत्नागिरी दणाणून टाकली.
ही विजयी मिरवणूक काढून उदय सामंत यांचे जल्लोषात रत्नागिरीत स्वागत करण्यात आले. शिवसेना रत्नागिरीतर्फे विजयी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. गेली 27 वर्षे रत्नागिरीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सर्वांचे लाडके नेतृत्व मंत्री उदय सामंत हे राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका निभावणारे नेतृत्व ओळखले जाते. निवडणूकीत पाचव्यांदा विजय प्राप्त केल्यानंतर उदय सामंत यांना तातडीने मुंबई येथे जावे लागले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच डिसेंबर अधिवेशनाला सुरवात झाली. त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर राज्याचे मंत्री म्हणून त्यांचा रविवारी प्रथमच दौरा रत्नागिरीमध्ये झाला.
त्याबद्दल विजयी मिरवणूक काढून उदय सामंत यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या मिरवणूकीमध्ये सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, मित्रमंडळी सहभागी झाली होती. सायंकाळी मारूती मंदिर सर्कल, रत्नागिरी येथे एकत्र येत मंत्री सामंत यांनी छ.शिवाजी महाराज पुतळयाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषी मिरवणूकीला प्रारंभ केला. मुख्य रस्त्यावरून जयस्तंभ परिसर येथ पर्यंत ही मिरवणूक डि.जे., ढोलताशे, फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी सहीत साजरी करण्यात आली.