
भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
रत्नागिरी:
दिवाळीनिमित्त विविध खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न मिळावे यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत भेसळीच्या संशयावरून अन्न पदार्थांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच या आस्थापनांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच भविष्यात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, सणासुदीच्या काळात विक्री करण्यात येणार्या अन्नपदार्थामध्ये भेसळ होत असल्यासंदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.