
तुमची उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधा
8591903608 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
रत्नागिरी
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी प्रकरणे समन्वयातून तडजोडीने निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालय, मुंबई येथे 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे दाखल करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे अध्यक्ष सुनील गोसावी व सचिव माणिकराव सातव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी आपली प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ही एक सुवर्णसंधी उच्च न्यायालयाने उपलब्ध करुन दिली आहे. तरी त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपली प्रकरणे सामंजस्याने सोडवावी. जलद तडजोड व विवादांचे निराकरण, विवादांचे किफायतशीर निराकरण, अंतिम आणि कार्यान्वित निर्णय, प्रकरणात लागलेली कोर्ट फीचा परतावा, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर येथे किंवा कार्यालयाच्या 8591903608 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कळविले आहे.