
रत्नागिरी तालुक्यातील गुंबद ग्रामपंचायतीला टी. बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : 09 ऑक्टोबर 2024 रोजी टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळाछत्रपती शिवाजी सभागृह जिल्हापरिषद रत्नागिरी येथे पार पडला .
महाराष्ट्रातील 2250 ग्रामपंचायती पात्र झाल्या त्यामध्ये जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीपैकी 42 ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणुन पात्र ठरल्या, त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील “गुंबद ग्रामपंचातीला “गौरविण्यात आले. तो सन्मान सरपंच सौ.उषा राजेश सावंत, ग्रामसेवकसंदिप जाधव आणि सैतवडे उपकेद्राच्या CHO धनश्री पावरी यांनी स्विकारला.
यामध्ये गुंबद गावातील वातावरण आरोग्यदायी निरोगी रहावे यासाठी नागरिकांचे सहकार्य तसेच वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाँ.श्रृती कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले असे गुंबद सरपंच सौ.उषा सावंत यांनी सांगितले.
सदर सोहळ्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी श्री कीर्ती किरण पुजार सर ,मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री राहुल देसाई सर,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये सर,मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र गावडे सर,मा.वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी डॉ ज्योत्स्ना वाघमारे मॅडम तसेस फिनोलेक्स कंपनी चे मॅनेजर श्री श्रीदत्त अलगुरु, वैद्यकीय अधिकारी फिनॉलेक्स डॉ अनुप करमरकर व सर्व NTEP कर्मचारी उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तेजस परपोलकर यांनी केली.