
बाप्पा पावला! रत्नागिरीत फुल विक्रीतून लाखोंची उलाढाल
रत्नागिरी : कोकणातील सर्वात महत्वाचा सण म्हणजचे गणेशोत्सवा. प्रत्येक घरात गणपतीची मूर्ति आणून तीचे पुजन केले जाते. त्यासाठी झेंडू, लिली, शेवंती, अष्टर या फुलांच्या हारांना मोठी मागणी असते. गेल्या आठवडाभरात दररोज रत्नागिरी शहरातील फुलवाल्यांकडून दिवसाला सात ते आठ टन झेंडूची फुले, हार विक्रीमधून सुमारे दहा लाखांची उलाढाल झाली. यामध्ये स्थानिक शेतकर्यांकडील फुलांचा टक्का कमीच आहे; मात्र पश्चिम महाराष्ट्रातून 80 टक्के फुले आणली जातात.
गणेशोत्सवाची धुमधाम अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु राहणार आहे. गौरी-गणपती विसर्जनादिवशी बहूसंख्य घरगुती गणपतींना निरोप दिला जातो. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणरायाची पुजा, सजावटीसाठी फुुलांना प्रचंड मागणी असते. त्यात दुर्वांसह झेंडू, लिली, शेवंता यांच्या फुलांचा हार वापरला जातो. अनेक ठिकाणी जास्वंदाची फुले मिळत नसल्याने बहूसंख्य घरांमध्ये झेंडूचे हार गळ्यात घालण्यासाठी वापरतात. त्यामुळे बाजारपेठेमध्ये हरतालिकेपासून फुलांच्या विक्रीला सुरवात होते. गणपती प्रतिष्ठापना, गौरी पुजन ते गणपती विसर्जनापर्यंत फुलांच्या हारांना प्रचंड मागणी असते. मूर्तिंच्या उंचीप्रमाणे हार वापरले जातात. छोटी मूर्ति असेल तर हार छोटा असतो. सार्वनिक मंडळांचे गणपतीच्या मूर्ति मोठ्या असल्यामुळे तिथे दहा फुटाहून अधिक उंचीचे हाराला मागणी असते. यंदा गणेशोत्सवाच्या सुरवातीला 150 रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली. याबाबत कुवारबाव येथील फुले आणि हार विक्री व्यावसाय करणारे पवार यांना दररोज 200 किलो फुले लागतात. हारांना लागणारा झेंडू कोल्हापुरसह रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, मजगाव, पावस, कोतवडे या सारख्या गावांमधून त्यांना मिळतो. यंदा झेंडूचा खरेदीचा दर 80 ते 90 रुपये असून ग्राहकांना तो 150 रुपये किलोने विकला गेला. झेेंडू, लिलीपासून बनवलेले हार 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत दराने विकले गेले. झेंडूबरोबरच लिलीए अॅस्टरची फुलांना मागणी असते. फुलांच्या विक्रीपेक्षाही हार बनवून त्यामधून फायदा अधिक मिळतो. साधारणपणे चाळीस टक्के फायदा व्यावसायात आहे. पण पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत आम्हाला काम करावे लागते.