
चाकरमान्यांचा कोकणाकडे प्रवास अद्यापही सुरू; गाड्या सात तासापर्यंत विलंबाने
रत्नागिरी
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा कोकणाकडील प्रवास अजुनही सुरुच आहे. गणपती आगमनाला न आलेले चाकरमानी गौरी पुजन आणि विसर्जनावेळी दाखल होतात. त्यामुळे अजूनही कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांना गर्दी आहे; मात्र गणेशोत्सवासाठी सोडलेल्या जादा ेफेर्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या एक तासापासून ते अगदी सात तासांपर्यंत विलंबाने धावत आहेत.
रोहा ते ठोकूर पर्यंतचा कोकण रेल्वे मार्ग अनेक ठिकाणी एकेरीच आहे. दर्या-खोर्यातील या मार्गावरील सर्व गाड्या विद्युतीकरणावर धावत आहे. हे आव्हान पूर्ण केल्यानंतर प्रवाशांकडून दुपदरीकरणाची मागणी होत आहे. लाखो चाकरमानी दरवर्षी गणपती, दिवाळी आणि शिमगोत्सवाला कोकणात येत असतात. दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्यांचे नियोजन केले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. एकेरी मार्गावरून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. अधिकच्या गाड्यांमुळे चाकरमान्यांनाचा प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा होती; परंतु जादा गाड्याही भरून येत होत्या. प्रचंड गर्दी आणि उशिरा धावणार्या गाड्या यामुळे चाकरमान्यांचा प्रवास कंटाळवाणा होत आहे. मंगळवारी दुपारी वेळापत्रकानुसार गाड्या धावत नव्हत्या.