
दांडे अणपुरे पुलावरील एकेरी वाहतूक सुरू
राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील तालुक्यातील दांडे अणसुरे पुलावरील एकेरी वाहतूक अखेर सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही वाहतूक सुरू झाली असून या पुलावरून दिवसभरामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागासह सिंधुदुर्गातून रत्नागिरीत जाणाऱ्या खासगी गाड्यांसह एस.टी. गाड्या प्रवाशांना घेऊन धावल्या आहेत. सागरी महामागांवरील हा महत्वपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने गणेशभक्तांसह ग्रामस्थांचा प्रवास सुरळीत झाला आहे.
दांडे-अणसुरे पुलावरुण सुरू झालेल्या एस.टी. च्या चालक-वाहकांचा आमदार डॉ. राजन साळवी आणि शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ यांनी स्वागत केले.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुंबई-गोवा महामार्गासह तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या सागरी महामागनिही जोडले गेले आहे. या सागरी महामागनि प्रवास करताना अंतर कमी होताना वेळेसह पैशाचीही बचत होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वाहनचालकांसह प्रवाशांकडून रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाण्यासाठी सागरी महामार्गाला अधिक पसंती दिली जात आहे. मात्र, या मार्गावरील तालुक्यातील दांडे अणसुरे पुलाचे गेल्या दीड दोन वर्षांपासून काम सुरू होते. संथ गतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे प्रवाशांसह वाहनचालकांना नाहक वेळेच्या अपव्ययासह आर्थिक भुरदंड सहन करावा लागत होता. त्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यासह प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरून प्रवासाची बसची चाचणी घेऊन नियंत्रित वेगाने तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्याची सूचना एस.टी आगार प्रशासनाला केली होती. त्याप्रमाणे या पुलावरून सागरी महामागनि आजपासून तात्पुरत्या स्वरूपामध्ये एस. टी. वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे सागरी महामागनि खासगी वा एसटी, गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
दांडे-अणसुरे पुलाच्या कामामुळे सागरी महामार्गावरील या भागातून बंदस्थितीमध्ये होता. त्यामुळे लोकांना राजापुरातून मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करीत सिंधुदुर्गात जाण्यासाठी वाहनचालकांना राजापूर-हातिवले-डोंगरफाटा- सागवेमार्गे देवगड-सिंधुदुर्ग असा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. तर, रत्नागिरीतून येणाऱ्या वाहन चालकांना रत्नागिरी-धारतळे-नाटे-साखरकोंबे -सागवेमार्गे देवगड सिंधुदुर्ग असा प्रवास करावा लागतो. यामध्ये सुमारे तीस-पस्तीस कि.मी. चा वळसा घालावा लागत होता. त्यामध्ये वाहन चालकांसह प्रवाशांना वेळाचा दुरूपयोग होताना नाहक आर्थिक भुर्दडही सहन करावा लागतो. त्यामुळे सागरी महामागनि प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह गणेशभक्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे.