
विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडताना उड्डाणपुलाचा वापर करावा
रत्नागिरी : माळनाका येथील उड्डाणपूल (ओव्हर ब्रीज) हा नागरिकांसह विशेष करून विद्यार्थी वर्गासाठी बांधला आहे. माळनाका हा शहरातील गजबजलेला परिसर आहे. येथे नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. यामुळे अपघाताच्या घटना येथे नेहमीच घडत असतात. असे असताना रा. भा. शिर्के प्रशालेचे अनेक विद्यार्थी रस्ता ओलांडताना उड्डाण पुलाचा वापर न करता थेट रस्त्यावरून धावत, मागे – पुढे होत, घोळका करून रस्ता ओलांडत असल्याचे बऱ्याचदा निदर्शनास आले आहे.
यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडू शकते. ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना पलीकडे येण्यासाठी उड्डाण पुलाचा वापर करावा, असा आग्रह धरावा किंवा शाळा सुरू होण्या आधी तसेच सुटल्यानंतर शाळेतील एखादा शिपाई मुख्य रस्त्यावर उभा करावा जेणेकरून विद्यार्थी रस्ता ओलांडताना त्यांच्यावर लक्ष राहील.