
नाणारमध्ये आता बॉक्साईट प्रकल्प; २९ ऑगस्टला सुनावणी
राजापूर : काही वर्षापूर्वी रिफायनरी प्रकल्पावरून चर्चेत आलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार गावात आता बॉक्साईट प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी गुरूवारी २९ ऑगस्ट २०२४ रोजी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. मात्र या बॉक्साईट प्रकल्पालाही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या बॉक्साईट प्रकल्पावरून नाणार परिसरातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्यानंतर हे गाव जगाच्या नकाशावर आले होते. रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी विविध आंदोलने छेडत शासनाच्या नाकीनऊ आणले होते. आंदोलने, मोर्चे यामुळे सातत्याने नाणार परिसर धगधगत होता. अखेर सन २०१९ मध्ये नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूनाच रद्द करण्यात आली. त्यानंतर नाणार शांत झाले होते. मात्र आता नाणार गावात पुन्हा एकदा नवीन प्रकल्प पाय रोवण्याच्या तयारीत आहे. गोवा, मडगाव येथील मे. सोशियेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमटेड या कंपनीचा नाणार बॉक्साईट ब्लॉक हा प्रकल्प नाणार येथील १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात येत आहे. प्रतिवर्ष ०.९ मेट्रीक टन बॉक्साईट उत्खनन क्षमता असलेल्या या प्रकल्पाकरिता गुरूवारी दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सागवे येथील हायस्कूलच्या सभागृहात जनसुनावणी होणार आहे.
दरम्यान, यापूर्वीदेखिल नाणार परिसरात बॉक्साईट प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावेळी या प्रकल्पाला विरोध झाल्याने या प्रकल्पाबाबत पुढे कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या . २० मे २०१९ रोजी राज्य शासनाने मे. सोशियेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमटेड या कंपनीला या ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी पसंतीचा बोलीदार म्हणुन मान्यता दिली होती . त्यानंतर अग्रीम देयकाचा १० % रक्कमेचा पहिला हप्ता या कंपणीने सादर केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १० सप्टेंबर २०२० च्या घोषणापत्राने (क्र . एमएमएन – ०७१९ / सी . आर . ४२ – पार्ट १० – / आयएनडी -९ ) या नाणार बॉक्साईट ब्लॉक या प्रकल्पाला मान्यता देली .
रिफायनरी प्रकल्प विरोधाच्या आंदोलनात उडी घेत शिवसेनेने सत्तेत असताना २०१९ च्या विधांसभा निवडणुकांच्या तोंडावर रिफायनरी प्रकल्प रद्द करुन घेण्यात यश मिळवले होते . राजकिय स्वार्थासाठी शिवसेनेने या प्रकल्पाचा बळी दिल्याची भावना त्यावेळी अनेक प्रकल्पग्रस्त प्रकल्पसमर्थकान्मधुन व्यक्त करण्यात येत होती . मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातुन सत्तेत येताच पुन्हा सिवसेनेने हा नवा प्रकल्प येथील जनतेच्या माथी मारला आहे . त्यामुळे नाणार येथील रिफायनरी प्रकल्पातील जागेचे सर्वाधिक व्यवहार करणाऱ्या शिवसेनेचे पक्सप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या कंपणीने परप्रंतियाना हाताशी धरुन केलेया जमीन विक्रीचा मोबदला या ना त्या हाताने परप्रांतियाना मिळावा यासाठीच शिवसेनेने ही राजकिय खेळी खेळल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे . शिवसेना सत्तेत असतानाच असे पर्यावरणाचा र्हास करणारे प्रकल्प मान्यता मिळवतात म्हणजे शिवसेनेचे कोकण प्रेम बेगडी असल्याचा दावा येथील जनतेने केला असुन आता पुन्हा नाणार या पकल्पाच्या विरोधाने होरपळुन निघणार आहे .
सुमारे १० दशलक्ष टन खनिज साठे आणि संसाधने असलेल्या या प्रकल्पाला आता स्थानिक जनतेनेही विरोध करण्यास सुरुवात केली आहे . आता हा स्थानिकांचा विरोध रिफायनरी प्रकल्पाप्रमाणे यशस्वी ठरणार कि हा नाणार बॉक्साईट ब्लॉक प्रकल्प कार्यान्वयीत होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत .