
राधाकृष्ण पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम संपन्न
रत्नागिरी : रत्नागिरीतील जुनी व नामवंत संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधाकृष्ण पतसंस्थेच्या वतीने रविवारी वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न झाला. शहरातील मंगळवार आठवडा बाजार येथे ११ झाडे लाऊन हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी राधाकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत वणजु, उपाध्यक्ष गणेश भिंगार्डे, सेक्रेटरी मकरंद खातू, संचालक मिलिंद दळी, सिद्धार्थ बेंडके, धनेश रायकर, शाखाधिकारी प्रथमेश पाथरे, सभासद अमोल डोंगरे, पिग्मी प्रतिनिधी नरेंद्र कोकाटे, प्रकाश शिर्वटकर, कर्मचारी केरेन करडे, कु. रिधान भिंगार्डे व वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
सुमारे ४२ वर्षांपासून राधाकृष्ण पत संस्था रत्नागिरी शहरात आपले कामकाज अत्यंत सुयोग्य पद्धतीने करीत आहे. लेखापरीक्षणात सातत्याने अ वर्ग मिळवणारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. संस्थेचा आलेख दिवसेंदिवस वाढत जाणारा आहे. याचमुळे सभासदात विश्वासाचे स्थान निर्माण करणारी हि एक संस्था ठरली आहे. आपल्या दैनंदिन कामकाजासोबत सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आता संचालकमंडळाने पुढाकार घेतला असून याच अनुषंगाने दिनांक ७ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले. यासाठी वृक्ष स्नेहसंवर्धन या ग्रुप चे देखील सहकार्य लाभले.