
यावर्षी सागरी गस्त ७ जूनपर्यंत सुरू राहणार
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारीची पावसाळी बंदी १ जूनपासून सुरू होत असली तरी समुद्रातील सहायक मत्स्य व्यवसाय विभागाची गस्त ७ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. शासनाने या वर्षी प्रथमच मासेमारीबंदीनंतर पुढील आठवडाभर समुद्रातील गस्तीला परवानगी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. जिल्ह्यात २ हजार ५२० सागरी मासेमारी नौका असून, यातील २ हजार ७४ मासेमारी नौका यांत्रिकी आहेत. या सर्व नौकांची पावसाळी मासेमारीबंदी १ जूनपासून सुरू होत आहे. माशांच्या प्रजनन काळात होणारी ही मासेमारी मासळीचे उत्पादन घटवणारी असते. त्यामुळे या वर्षी प्रथमच मासेमारीची पावसाळी बंदी सुरू झाल्यानंतर पुढील आठवडाभर समुद्रातील गस्त सुरू राहणार आहे.