
नादुरुस्त हातपंप, विद्युत पंपांची तत्काळ दुरुस्ती करा
रत्नागिरी :ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत पिण्याचे पाणी प्रामीण जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे खोदलेल्या विंधण विहिरींवर बसविण्यात आलेल्या हातपंप / विद्युतपंपीं दुरूस्ती गेल्या वर्षभरापासून दुरूस्ती रखडलेली आहे. सद्यााया पाणीटांईकाळात विशेष कृती आराखडा तयार करून हातपंप किंवा विधनविहीरीं योग्यरित्या कार्यरत राहण्यासाठी दुरूस्ती केली जावी अशा सूचना आहेत, पण जिल्हास्तरावर टांईनिवारणासाठी गतवर्षीपासून रखडलेली दुरूस्ती टांईग्रस्त गावीं संख्येत भर पडत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या विधण विहिरींची देखभाल व दुरुस्ती करुन गावातील जनतेला नियमित पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची आहे. सबब, गावातील सर्व विधण विहिरीवरील हातपंप विद्युतपंप नेहमी कार्यान्वित राहतील याची ग्रामपंचायतीने काळजी घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने हातपंप / विद्युत पंपाच्या नियमित देखभाल व दुरुस्तीकरिता त्रिस्तरीय देखभाल व दुरुस्ती योजना विहित केली आहे. त्याबाबत दिनांक 16 ऑक्टोबर, 1998 च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला आहे. जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधीस्तरावरूनही त्या दुरूस्तीसाठी पत्रांद्वारे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे.
ग्रामस्तरावर असलेल्या विंधण विहिरीवरील हातपंप / विद्युतपंपाची दुरुस्ती वेळीच होत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. विशेषत ही समस्या पाणी टंचाईच्या कालावधीत तर आणखी भीषण स्वरुप धारण करते. ही बाब लक्षात घेता, प्रामस्तरावरील प्रत्येक विधण विहिरीची देखभाल व दुरुस्ती ही वेळीच व परिणामकारकरित्या व्हावी यासाठी कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. गाव पातळीवर प्रत्येक हातपंपासाठी एक या प्रमाणात काळजीवाहक म्हणून गावातील हातपंपाजवळच्या एका जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी. त्या व्यक्तीची निवड प्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने करावी. काळजीवाहक म्हणून निवडलेल्या व्यक्तीला हातपंपाची कार्यपध्दती, देखभाल व दुरुस्ती यासंबंधीचे एक आठवडयाचे प्रशिक्षण देण्यात यावे. अशा प्रकारे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उप अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जिल्हा परिषद यांनी करावी. त्या व्यक्तीला देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी संदर्भिय शासन निर्णयात नमूद केलेली अवजारे जिल्हा परिषदांनी पुरवावीत व त्यास संदर्भिय शासन निर्णयातील निदेशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे शासन निर्देशही आहेत.
पण संभाव्य पाणीटांई निवारणाया उपाययोजना राबविल्या जात असताना जिल्ह्य़ात प्रशासनस्तरावर हातपंप/विंधनविहीरी योग्यरित्या कार्यरत राहतील याकडे दुर्लक्ष झालेले असल्यो लोकप्रतिनिधीं स्तरावरूनही बोलले जात आहे. त्यासाठी पाणीटांईााs संकट दूर करण्यासाठी या उपाययोजनेकडे गांभिर्याने पाहण्यी गरज निर्माण झालेली आहे. हातपंप व विद्युतपंपांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सक्षमरित्या होण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा व उप अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जिल्हा परिषद यांच्या सहमतीने प्रत्येक स्तरावरील वेळापत्रक तयार करावे अशीही मागणी प्रशासनाकडे होत आहे.
हातपंप/विंधनविहीरी दुरूस्तीसाठी -जिल्हा स्तरावर प्रत्येक 500 हातपंपांसाठी 1 यांत्रिकी पर्यवेक्षक, 1 यांत्रिकी व 1 मदतनीस यांची फिरती दुरुस्ती पथके निर्माण करण्यात यावीत. अशी पथके वेगवेगळया तालुक्यांच्या ठिकाणी असावीत. पथकांस आवश्यक ती सर्व हत्यारे-अवजारे व सुटे भाग यांनी युक्त 1 वाहन (पिकअप व्हॅन) पुरविण्यात यावे. त्या पथकाने जिल्हयातील नादुरुस्त असलेल्या हातपंपाची मोठय़ा स्वरुपाची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. जिल्हयातील जुने व कायमचे नादुरुस्त व निरुपयोगी झालेले हातपंप काढून त्या ठिकाणी नवीन मजबूत हातपंप बमवावयाचे आहेत, तसेच इतर अनुषंगिक कामेही करावयाची आहेत. निरीक्षणाचे व दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे व वेळेवर व्हावे यासाठी सदर पथकाने खालील सूचनांनुसार वेळापत्रक तयार करावे. जिल्हयातील उच्च क्षमता असलेल्या विषण विहिरीवर बसविलेल्या विद्युतपंपाची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक 50 विद्युतपंपासाठी 1 या प्रमाणात वीजतंत्रीची पदे निर्माण करण्यात यावीत. r तालुका पातळीवर तालुक्यातील प्रत्येक 100 हातपंपासाठी 1 किंवा तालुक्यातील 50 गावांसाठी 1 या प्रमाणात तंत्रज्ञाची नेमणूक करण्यात यावी. अशा तंत्रज्ञाला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या ग्रामीण स्वयंरोजगार (ट्रायसेम) योजनेखाली तीन महिन्याच्या कालावधीचे हातपंपाचे देखभाल व दुरुस्तीबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे.