
नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. संदिप कांबळे यांची निवड
रत्नागिरी : तालुक्यातील खानू गावचे सुपुत्र सेंद्रिय शेती धोरण व विपणन महाराष्ट्र राज्य समिती तसेच प्रमाणिकरण समिती सदस्य महाराष्ट्र राज्य डॉ. संदीप कांबळे यांची यशदा पुणे येथे होणार्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी कोकण विभागातून निवड करण्यात आली आहे. केंद्रिय सहसचिव (आयएनएम) यांच्या सूचने प्रमाणे पुणे येथे एक दिवसीय “Consultation on the Science of Natural Farming” या विषयावर उद्या यशदा, पुणे येथे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलेली आहे. सदर कार्यशाळेत सहसचिव (आय एनएम), विविध राज्यांतील सचिव, केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकारी तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक केरळ, गोवा, दादरा आणि नगर हवेली तसेच दमण व दिव आणि लक्ष्यद्वीप या ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील २५० शेती शास्त्रज्ञ, अधिकारी व प्रयोगशिल शेतकरी उपस्थित राहणार आहेत. नैसर्गिक शेतीबाबत धोरण आणि त्या अनुषंगाने राबविण्यात येणान्या योजना व नियोजन या बाबत परिषदेत करण्यात येणार आहे.
डॉ. संदिप कांबळे यांची या आधी २०१८ मध्ये ग्रेटर नोयडा या ठिकाणी पार पडलेल्या ११९ देशांच्या परिषदेच्यासाठी शासनामार्फत निवड करण्यात आली होती. त्यांची नैसर्गिक शेतीबाबत देश तसेच विदेशात व्याख्याने व दौरे होत असतात. त्यांच्या अनुभवाचा कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्राला नैसर्गिक शेती धोरण राबविण्यासाठी उपयोग होवू शकतो. त्यांच्या निवडी बद्दल कृषि आयुक्तालय पुणे कृषि संचालक आत्मा दशरथ तांभाळे यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या या निवडी बाबत विविध स्तरावरून त्यांचेवर अभिनंदन होत आहे.