
दहा वर्षातील काम हा फक्त ट्रेलर, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पूर्ण पिक्चर दिसेल – प्रमोद सावंत
रत्नागिरी ःपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेले काम हा ट्रेलर आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आणखीन पिक्चर स्पष्ट होईल. देश महासत्ता बनेल. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही संकल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाले पाहिजे. यासाठी देशातून 400 पेक्षा जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत आणि म्हणून रत्नागिरी सिंधदुर्ग जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांना प्रचंड मताने निवडून देऊया असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. रत्नागिरी येथे जाहीर सभेला ते संबोधित करताना बोलत होते.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्ष यांची महायुती आहे आणि या महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना उमेदवारी मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणांहून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे. या सभेतून विजयाचा संकल्प करून मागे परतुया आणि गावा गावात जाऊन जनतेपर्यंत मोदिंनी केलेली विकासकामे पोहचुया आणि मते भाजपच्या कमळ चिन्हावर घेऊया. मोदी सरकारची गरज देशाला विकासकाकडे नेण्यासाठी जगात पहिल्या तीन स्थानावर देश येण्यासाठी आवश्यकता आहे. जनसामान्यांचा विकास करायचा असेल तर पुन्हा मोदी सरकारची गरज आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या मतदार संघात भाजपचे नेते नारायण राणे यांच्याबद्दल जनतेत असलेले प्रेम आपुलकी मतात परीवर्तीत करून त्यांना प्रचंड मतांनी विजय प्राप्त करून देण्यासाठी कामाला लागा आणि तो विजय आपण निश्चित कराल असा विश्वासही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.