
कवितके कुटुंबाचा जागरणाचा कार्यक्रम वाघ्या मुरळीना मान सन्मान देणारा
रत्नागिरी:- देवदासी ( मुरळी) म्हटलं की समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा कसा असतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. मुरळी म्हटलं की सर्वांच्याच भुवया उंचावल्या जातात, परंतु याच देवदासीमुळे आपल्या सर्वच शुभकार्यातील घेण्यात येणाऱ्या जागरणाने आपले देव देव कार्यक्रम पूर्ण होतात,परंतु हे कार्यक्रम करत असताना मुरळी विषयी आपल्या मनातल्या भावना काय असतात हे आपल्याला चांगले ज्ञात आहे. यासाठी समाजामध्ये वाघ्या मुरळी प्रती सद्भावना तयार व्हावी असा एक कार्यक्रम रत्नागिरी समुद्र किनार्यालगत असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील मंदिरामध्ये घेण्यात आला होता. या कार्यक्रमात कवितके कुटुंबाने घेतलेला जागर कार्यक्रम व वाघ्या मुरळी सोबत केलेले नृत्य व गायन हे खरोखरच वाघ्या मुरळीना लक्षणिय मान सन्मान व आदरातिथ्य देणारे व समाजाला प्रेरणादायी ठरणारे आहे
मूळ महिमगड तालुका माण येथील मूळ कवितके कुटुंब या सर्वसाधारण कुटुंबातील १५० ते २०० लोकं या कुटुंबात आहेत. महीनगड ही माण तालुक्यातील एकेकाळची मोठी बाजारपेठ मानली जात होती. कालांतराने ही बाजारपेठ संपुष्टात आली व येथील व्यवसायिक आपल्या व्यवसायाच्या शोधात बाहेर पडले. त्यातील कवीतके कुटुंब महिनगड, पुसेगाव, फलटण, पुणे, तसेच मोठ्या प्रमाणात कोकणात वास्तव्यास गेले. कोकणातील लांजा, दापोली, चिपळूण रत्नागिरी अशा मोठ्या शहरात वास्तव्य केले. आपल्या व्यवसायाला भरभराटीस नेले. आज या प्रत्येक शहरात कवितके कुटुंबाची ओळख मोठे व्यवसायिक म्हणून आहे. सातारा येथील रूप समीर, गुरुदेव क्लॉथ तसेच कोकणात पांडुरंग क्लॉथ स्टोअर , हरी कृष्ण क्लॉथ स्टोअर, सरस्वती क्लॉथ स्टोअर, उदय कलेक्शन, आर. के. टेक्सटाइल, सुविधा कलेक्शन, नागरिक सुटिंग आणि शरटिंग, वामा लूक सिल्क साडी अशी अनेक प्रसिद्ध दुकाने कवीतके कुटुंबाच्या नावावर आहेत.
कवितके कुटुंबात दर तीन वर्षांनी असा देव देव कार्यक्रम घेण्यात येतो. दरवेळी महिनगड तालुक्यातील माण येथील मूळ घरी हा कार्यक्रम असतो. मात्र या वेळी रत्नागिरी मधील कवितके कुटुंबाने हा कार्यक्रम रत्नागिरी मध्ये आयोजित केला होता. देवीच्या मंदिरात दिवसभर पूजा पाठ, नंतर गोंधळ, महाप्रसाद, जागर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जा कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा , फलटण तालुक्यातील बरड या गावातील सुनील भिसे यांचा जागरण कार्यक्रम सादर करण्यात आला.
या जागर कार्यक्रमात देवी देवतांची गीते सादर करण्यात आली. यावेळी कावितके कुटुंबातील मोठमोठी व्यवसायिक जोडपी व इतर महिला पुरुष वाघ्या मुरळी यांच्या सोबत सहभागी झाले होते. या आपलेपणासच्या वागणुकीमुळे वाघ्या मुरळी भारावून गेले. यात कोणताही उच्च नीच भेदभाव नव्हता. असा भक्तिभाव असलेला कार्यक्रम समाजाला नक्कीच प्रेरणादायी आहे.
यावेळी वाघ्या योगेश धुमाळ यांनी या कार्यक्रमाविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले हा कार्यक्रम मनाला आनंद देणारा आहे. कवितके कुटुंबातील एवढी व्यवसायाने प्रापंचिक पद्धतीने मोठी लोक नामांकित लोकं आमच्या सोबत नाचली गायली त्यांनी हा आम्हाला सन्मान मिळवून दिला आहे. तो लक्षणीय असून या कार्यक्रमाने आम्ही भारावून गेलो आहोत.
तर मुरळी विद्या जावळे म्हणाल्या की कवितके कुटुंबासारखा सुसंस्कृत पणा आम्ही आजपर्यंत कुठेही अनुभवला नाही. उच्चशिक्षित व सुसंस्कृत स्त्री पुरुष आमच्या सोबत नाचले गायले. हा देव देव कार्यक्रम नेहमीच अविस्मरणीय राहील.
यावेळी वाघ्या मुरळी जागरण गोंधळ पार्टीचे सुनील भिसे व त्यांचे सहकारी सूरज रोकडे यांनी यावेळी कवितके कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.