
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
समस्त रत्नागिरीकरांना आणि रंगकर्मीना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे मला समाधान :- उदय सामंत
रत्नागिरी :राज्याचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी रत्नागिरीकरांना दिलेला शब्द पूर्ण करत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा उद्योगमंत्री तथा रत्नागिरी रायगड पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला.
नाट्यगृहाबाबत येणाऱ्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृहाचे रुपडेच पलटून टाकले. नाट्यगृहात नवीन व्ही आर एस कुलिंग यंत्रणा बसवण्यात आली असून नवीन साऊंड सिस्टिम बसवून नाट्यगृह पूर्ण पणे ऑटोस्टिक करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या बाबत अनेक रंग कर्मींनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेऊन नाट्यगृहाला भेट दिली आणि नाट्यगृहाची पाहणी केली त्यावेळेस नाट्यगृहाची अवस्था पाहून पालकमंत्री यांनी याचं रूप बदलण्याचा निर्णय घेतला तसा शब्द रत्नागिरीतील समस्त रंगकर्मी आणि रत्नागिरीकरांना दिला दिलेला शब्द तंतोतंत पालन करत अवघ्या 67 दिवसात चेहरा मोहरा बदलण्यात पालकमंत्री उदय सामंत आणि नगरपरिषद रत्नागिरी प्रशासनाला यश आले. महाराष्ट्रामधील उत्कृष्ट नाट्यगृह जर कुठे असेल तर ते रत्नागिरीत आहे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमादरम्यान ठणकावून सांगितले. रत्नागिरीतील व्यवसायिक तसेच हौशी रंगकर्मींसाठी जे हवे होते ते करण्याचे प्रामाणिकपणे काम तुमचा पालकमंत्री म्हणून मी केले असून उभी केलेली वास्तू चांगल्या पद्धतीने जपा ही अपेक्षाही या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी व्यक्त केली. ज्यांनी ज्यांनी या नाट्यगृहाची बदनामी केली त्यांनी पुन्हा येऊन पाहावे आमचे नाट्यगृह सांभाळण्याची ताकद आमच्याकडे असल्याचा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी बदनामी करणाऱ्यावर लगावला. यावेळी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे कौतुक करत म्हणाले जनतेमध्ये जाऊन काम करणाऱ्यांची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली की तें काम पूर्णत्वास जातं याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे रत्नागिरी हे नाट्यगृह आहे. प्रशासनातील अधिकारी ते कर्मचारी यांनी विकासाला पाठबळ दिलं आणि त्यामुळेच रत्नागिरीमध्ये विकासाची गंगा आली असे उदगार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान रत्नागिरीतील तमाम जनतेला आणि प्रशासनाला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक भेट देत सांगितले की रत्नागिरीतील टर्मिनल बिल्डिंग चे कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्याला १०२ कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला आवश्यक असणारी प्रशासकीय भवनालाही ९२ कोटींचा निधी देऊन त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे जाहीर केले. मी जे जे शब्द दिले तें प्रामाणिकपणे पूर्ण केले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमाला उद्योजक पितृतुल्य अण्णा सामंत, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांतअधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, ज्येष्ठ नाट्यकर्मी समीर इंदुलकर, दादा वंजु आप्पा रण भिसे, श्रीकांत पाटील, अनिल दांडेकर,संतोष रेडिज, संजय वैशंपायी मनोहर जोशी, आदी सह समस्त रत्नागिरी कर, रंगकर्मी उपस्थिती होते.