
आरटीओच्या जनजागृतीमुळेच अपघात वीस टक्क्यांनी घटले – ना. सामंत
रत्नागिरी :सुरक्षित वाहतुकीसंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या चांगल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात २० टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याबद्धल या कार्यालयाचे अभिनंदन करतो. रिक्षा, टॅक्सी, काळ्या-पिवळ्या रंगाच्या गाड्याच त्यांच्यासाठी मर्सडिस आहेत. अनावधानाने वाहनधारकाकडुन चुक झाली तर त्यांना माफ करा, तुम्हाला आशिर्वाद मिळेत. तुमचे नियम मोडू नका, परंतु वाहनधारकांना त्रास देऊ नका, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी आरटीओ विभागाला सूचना केल्या.
35 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, सहायक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सौ. शाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओढवणेकर आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, कॉलेजच्या मुलांनी आज पथनाट्याच्या माध्यमातून वाहतुक नियमाबाबत जनजागृती केली. त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून हे धाडस केले. कारण नाट्यगृहामध्ये व्यवसायाच्यादृष्टीने अनेकजन स्टेजवर आपले कार्यक्रम करतात. परंतु हे विद्यार्थी आणि आरटीओ समाज सेवेचा करतात. त्यामुळे त्यांने विशेष आभार. वाहन चालविताना काय खबरदारी घ्यायला हवी ते आताच्या पथनाट्यातून सांगितले. त्याची मी स्वतःपासून सुरवात केली आहे. जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण २० टक्क्याने घटले आहे. याचा अर्थ आरटीओंकडुन वाहतुक सुरक्षेबाबत चांगली जनजागकृती सुरू आहे.
मी देखील लोकप्रतिनिधी असण्यापूर्वी आरटीओ विभागाची कामे माझ्याकडे दिली होती. त्यामुळे तेव्हा आरटीओ सांभाळताना नाकी नऊ येते होते.
नागरिकाना आरटीओ कार्यालयात चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी साडे चार कोटीचा निधी देऊन वर नवीन बिल्डिंग बांधण्यात आली आहे. आणखी काही सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आणखी अडिच कोटी रुपणे निधी देत आहे. अजून काही हवं असेल तर तसा प्रस्ताव द्या. कारण आपल्या नागरिकांना येथे चांगल्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे आता तुम्ही ठरावा की जनतेची कळजी करणाऱ्या सोबत रहायचे की नाही. नाक्यावर उभे रहण्यापेक्षा नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे चांगले काम करा. मुंबईमध्ये वाहनधारकांना मोबाईद्वारे जो दंड केला जातो, तशी प्रथा आपल्याकडा येऊ देऊ नका. एखाद्या वाहनधारकाकडुन अनावधनाने चुक झाली तर माफ करा, तुम्हाला आशीर्वाद मिळतील. कारण त्यांचे वाहन हीच त्यांची मर्सडिस असते. नियम मोडू नका, परंतु विनाकारण त्रासही देऊ नका, असा सुचना श्री. सामंत यांनी केल्या. तुम्ही नागरिकांना चांगली सेवा द्या, नागरिक पुजा करती. राज्यात आपल्या आरटीओ कार्यालयाचे नाव होईल, अशी नागरिकांना सेवा द्या, असे आवहानही श्री. सामंत यांनी केले.