
किरकोळ कारणातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- गाडी थांबवली नाही यांचा राग धरुन शिवीगाळ व लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र रामचंद्र जाधव व रामचंद्र जाधव (रा. चाफे-बौद्धवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास चाफे-बौद्धवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश वसंत जाधव (वय ३५, रा. चाफे बौद्धवाडी, रत्नागिरी) हे आणि संशयित नातेवाईक आहेत. बाहेर जाताना रस्त्यात सिद्धेश यांनी गाडी थांबवली नाही याचा राग मनात धरुन संशयितांनी घराजवळ येऊन शिवीगाळ करुन हाताच्या थापटाने व लाकडी दांडयाने मारहाण केली. या प्रकरणी सिद्धेश जाधव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.