
प्रवास दर्जा उंचावण्यासाठी महामंडळ करणार पुनरुज्जीवन आराखडा
रत्नागिरी :प्रवास दर्जा उंचावण्यासाठी महामंडळाने एसटी पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्वावरील गाड्यांची संख्या जास्त आणि डिझेलवरील बसची संख्या कमी करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार डिसेंबर 2024 अखेरपर्यत तब्बल पाच हजार बस दाखल होणार आहे.यात इलेक्ट्रिक आणि साध्या बसचा समावेश आहे. यामुळे एसटीचा प्रवास नविन वर्षात अधिक सुकर ,आरामयादी आणि वेगवान होणार आहे.
महामंडळाच्या ताफ्यातील 15,922 (स्वमालकीच्या) पैकी सुमारे सात हजार एसटी खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यातच वर्ष 2016 ते 2019मध्ये नवीन गाड्या न घेता केवळ वापरातील गाड्यांचे नूतनीकरण करण्यावर महामंडळाने भर दिला . त्यामुळे खडखडाट झालेल्या,मोडकळीस
आलेल्या एसटीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत
प्रवास आणि महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिल्याने एसटीची प्रवासी संख्या वाढली आहे. वाढत्या प्रवासी संख्येसाठी महामंडळाने आता नविन एसटी
ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आखली आहे.