
विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबविणार
रत्नागिरी :राज्यातील महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात प्रवेश नोंदणी होऊन जागा रिक्त राहतात. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमांची माहिती देऊन प्रवेशाचे नोंदणी प्रमाण वाढवण्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे.
पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने पदविका प्रवेशाकरिता येणार्या शैक्षणिक वर्षासाठी संभाव्य विद्यार्थी व त्यांचे पालक यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी या उपक्रमाची माहिती व जन जागृती करण्यासाठी स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबविला होता. त्यामुळे प्रवेशात वाढ झाली होती. याच धर्तीवर आता प्रत्येक विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या माध्यमातून 15 ते 31 जानेवारी दरम्यान, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.