
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे उपोषण स्थगित
रत्नागिरी :महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व रत्नागिरी नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता नळपाणी योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण अहवाल येईपर्यंत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपले उपोषण तुर्तास स्थगित केले आहे. मात्र अहवाल आल्यानंतर तो समाधानकारक नसल्यास आंदोलनावर ठाम असल्याचे श्री.राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रत्नागिरीची नवीन नळपाणी योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली नाही, 54 कोटी रुपये निधी सुरुवातीच्या काणात उपलब्ध झाला. मात्र वाढीव निधी आणि वाढीव वेळ प्राप्त झाल्यानंतरदेखील काम पूर्णत्वास गेले नाही. यास अधिकार्यांची अकार्यक्षमता जबाबदार आहे की उदासिनता? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना विचारला होता. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र असे न झाल्यास भारतीय जनता पक्ष तोवर आंदोलन छेडेल, असा इशारा दिला होता. त्याला पालिका मुख्याधिकार्यांसह जिवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी श्री.सावंत यांना लेखी उत्तर देत आंदोलन न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर श्री.सावंत यांनी आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे.
पालिकामुख्याधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार जीवन प्राधिकर पर्यवेक्षणाखाली योजनेचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. संपुर्ण शहराला 110 मीमी व्यासाची 1 लाख 20 हजार ,278 मिटर लांब जलवाहिनी टाकण्यात आली आहे. नियमानुसार 1 मीटर खोलीवर लाईन टाकण्यात आली आहे. मात्र जेथे शक्यनाही तेथे 2 फूटावर पाईप लाईन टाकण्यात आल्याचे पालिकेने मान्य केले आहे.पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार संपूर्ण शहरभर एचडीपीई मटेरीयलच्या तर काही ठिकाणी डिआय मटेरीयलच्या जलवितरण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. शहराची भौगोलिक परिस्थितीचा विचार करता नैसर्गिक उतार असल्याने जलवाहिन्यांवर अनेक ठिकाणी एअर व्हाल्व टाकणे आवश्यक होते. जलवाहिनीवर आवश्यक त्या ठिकाणी एअरव्हाल्व बसविण्याच्या ठेकेदारास सूचना देण्यात आल्या असून येत्या काही दिवसांत जलवाहिनीवर एअरव्हाल्व बसविण्याचे काम पूर्ण हाईल.
परीणामी, एअरव्हाल्वच्या अभावी वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना टळू शकतील. रत्नागिरी शहर पाणीपुरवठा योजनेकरिता वापरलेल्या पाईप्सची गुणवत्ता तपासणी एसजीएस सारख्या मान्यताप्राप्त त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आली असून पाईप्सच्या दर्जाबाबत योजनेचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांनी खातरजमा केल्यानंतर जलवाहिन्या अंथरण्यात आलेल्या आहेत. तसेच, झालेल्या कामाचे वेळोवेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय या त्रयस्त यंत्रणेकडून त्रयस्त तांत्रिक लेखापरीक्षण केले जाते असल्याचे पालिकेने सांगितल्याचे श्री.सावंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रत्नागिरी शहर पाणीपुरवठा योजनेमधील वाढीव जलवितरण वाहिन्यांची कामे, प्रत्यक्ष स्थळपरीस्थिती, रत्नागिरी तालुक्यात होणारे मुसळधार पर्जन्यमान व त्यामुळे कामात येणार्या अडचणी इ. बाबी विचारात घेता पाणीपुरवठा योजनेचे उर्वरीत काम 100ट्क्के पुर्ण होण्याच्या दृष्टीने अभिकारक मे. अन्वी कन्स्ट्रक्शन यांस दि. 31 डिसेंबर2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरील योजनेचे काम 100टक्के पूर्ण झाल्यानंतर तसेच, कामाचा दोष निवारण दायित्व कालावधी संपुष्टात आल्यानंतरच ठेकेदाराला कार्यालयाकडे जमा असलेल्या सुरक्षा अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार असल्याचे पालिकेने दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.